
उपवास व प्रार्थनेसाठी महत्वाचे मुद्दे !
प्रास्ताविक : आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की उपवास व प्रार्थने द्वारे आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो , किंवा उपास व प्रार्थना आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते.
उपवास हा देवाशी आपला संबंध अधिक दृढ करतो. देवाकडून सामर्थ्य प्राप्त करून घेण्याचा हा एक मार्ग आहे. उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नव्हे, परंतु देवाकडुन तृप्तता आणि व्यक्तित्वात बदलण्याचा अनुभव आहे.
पहिल्या मंडळी मध्ये उपवास हा विश्वासणाऱ्यांसाठी एक नियमित सराव असायचा. यामुळे ते पवित्र आत्म्या मध्ये अधिक संवेदनशील असावयाचे, त्यांची जीवने प्रगतिशील होती आणि पाप व शापाच्या बंधनांचे साखळदंड तुटल्या जात.
यशया ५ ८ सांगते : “कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.
ते तर रोजरोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; देवाची समीपता ते इच्छितात.
आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? ’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.
पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.
मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?
दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?
तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?
असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.
तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील;
जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,
परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्या झर्याप्रमाणे होशील,
बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.
तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस;
तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन; आणि तुझा पिता याकोब ह्याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन; परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत.”
आपल्या जीवनात देवाच्या परिवर्तन करणाऱ्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी उपवास व प्रार्थना करा.
उपवास व प्रार्थनेसाठी काही मुद्दे
ताज्या व शक्तिशाली अभिषेकासाठी प्रार्थना करा.
देवाचे शक्तिशाली प्रगटीकरण व्हावे म्हणून प्रार्थना.
देवाच्या वचनातील मार्गदर्शन कळावे म्हणून आत्मिक नेत्र उघडण्यासाठी प्रार्थना करा .
धार्मिकतेची भूक वाढावी म्हणून प्रार्थना करा.
देवाबरोबर आपले नाते दृढ असावे व रोज त्याच्या बरोबर चालावे म्हणून त्याच्याकडे कृपा मागा: देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते. ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू. स्तोत्र ३ ६ : ७ -९
देवाने शक्तिशाली मार्गाने तुमच्या व तुमच्या सभोवतालच्या लोकात कार्य करावे म्हणून प्रार्थना करा.
देवाने आपले दृष्टीकोन बदलावेत व आपले विचार आणि इच्छा त्याच्या इच्छेनुरूप असाव्यात अशी प्रार्थना करा.
जीवनात प्रगती साठी प्रार्थना करा. मंडळीतील व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी प्रार्थना करा

अध्यात्मिक गोष्टींना महत्व देता यावे म्हणून देवाकडे संवेदनशीलता व कृपा मागा:अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणे बर्णबा, निग्र शिमोन, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला), आणि शौल.ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले. आहे” म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले. प्रेषित १ ३:१-३
शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना करा.
सैतानी किल्ले उध्वस्त व्हावे म्हणून प्रार्थना
व्यसनांपासून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना
जीवन धैर्यशील व्हावे म्हणून प्रार्थना .
मत्तय ४ :४ येशूने उत्तर दिले, “असेल आहे की, ‘मनुष्य भाकरीने जग असे नाही तर देवाच्या तोंडून सर्व शब्द जगेल.” ‘ अनुवाद 8:3 परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले.
मत्तय ६ ;१ ६ -१ ८ “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
योएल २ :१ २ -१ ३ परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा.13तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा” परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही.
दानिएल ९ : ३ -४ मग मी देव माझा प्रभू ,याची प्रार्थना केली व कृपेची याचना केली. मी उपवास केला व शोकप्रदर्शक कपडे घातले. मी डोक्यात धूळ टाकून घेतली. मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस.
एज्रा ८ :२ १ -२ ३ तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला.
१ योहान ५ : १ ३ -१ ५ मी हे तुम्हाला लिहिले आहे ह्याचे कारण हे आहे की, जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता, त्या तुम्हाला समजावे की, तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. १४आणि आपल्याला त्याच्यासमोर धैर्य आहे, कारण आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो. १५आपण काही मागितले असता तो आपले ऐकतो हे जर आपण जाणतो, तर आपण हे जाणतो की, आपण त्याच्याकडून ज्या मागण्या मागितल्या त्या आपल्याला मिळाल्या आहेत.
२ पेत्र ३ :९ -१ ० कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.